HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या ‘त्या’ आरोपांमुळे विखेंना मंत्रिपद दिले का ?

मुंबई | “मुंबईच्या विकास आराखडय़ात बिल्डर्सना एक लाख कोटी रुपयांचा फायदा मिळवून देणाऱ्या तरतुदी केल्याबद्दल १० हजार कोटी रुपयांचा सौदा ठरला. मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाच हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला”, असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदी असताना आम्ही केला होता. याचवरुन आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या आरोपांवर पडदा टाकण्यासाठी विखे पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले आहे का ?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

इतकेच नव्हे तर त्या सर्व आरोपांची गृहनिर्माण मंत्रिपद मिळालेल्या विखे-पाटील यांनी चौकशी करावी, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशापासून म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वीपासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती. लोकसभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघडपणे शिवसेना-भाजपचा प्रचार देखील केला. नुकत्याच (१६ जून) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अखेर राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह १३ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खानचा एनसीबी कोठडीमधील मुक्काम दोन दिवसांनी वाढला

News Desk

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधान झालेलेही पाहायला आवडेल !

News Desk

महाराष्ट्रात हे चालले तरी काय?…. देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल!

News Desk