HW News Marathi
महाराष्ट्र

देगलूरमध्ये जितेश अंतापूरकरांना सहानुभूतीची फायदा झाला! – रामदास आठवले

नांदेड । नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. तर भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या विजयाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “देगलूर मतदारसंघांमध्ये जितेश अंतापूरकर यांना सहानुभूतीची फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. आमचा उमेदवार निवडून येईल अशी आम्हाला आशा होती,” असं रामदास आठवले म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले की, “देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये अंतापूरकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे जितेश अंतापूरकर यांना सहानुभूतीची फायदा झाला. आमचा उमेदवार निवडून येईल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु फायदा अंतापूरकर यांना झाला,” असं रामदास आठवले म्हणाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला संपूर्ण देशात यश मिळालं. दादरा नगरहवेलीत शिवसेनेचा उमेदवार जिंकला. आमच्या शुभेच्छा आहेत. देगलूरमध्ये मात्र जितेश अंतापूरकर यांना सहानुभूतीची फायदा झाला, असंही यावेळी रामदास आठवले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर…”,चंद्रकांत पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा  

News Desk

जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार

Aprna

“…म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते”, गोपीचंद पडळकरांचे जितेंद्र आव्हाडांवर टीका

Aprna