HW News Marathi
महाराष्ट्र

….म्हणून राज्यपाल गोव्याला गेले, राजभवनाकडून स्पष्टीकरण

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र येत पाठींबा दिला आहे. मुंबईतील शेतक-यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनीही पाठिंबा दिलेला आहे. आझाद मैदानातील जाहीर सभा झाल्यानंतर शेतकरी मोर्चा राजभवनाकडे वळला होता.

पण या मोर्चाला मेट्रो चौकात पोलिसांनी अडवले होते. दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारीही गोव्याला गेले आहेत. त्यामुळे राज्यपालांवर शेतकरी आणि राजकीय नेते आक्रमकपणे टीका करत आहेत. या पार्श्वभूमिवर राजभवनाकडून राज्यपाल कोश्यारी यांच्या गोवा दौ-याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिर‍िक्त कार्यभार आहे व दिनांक २५ जानेवारीला ते गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोध‍ित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राज भवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले होते.

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना २२ जानेवारी रोजी दुरध्वनीवरुन तसेच निमंत्रक प्रकाश रेडडी यांना २४ जानेवारीला लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धते बद्दल कळवण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप मिळयाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेडडी यांना या बाबतचे लेखी पत्र २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे, असे राजभवनातून स्पष्ट करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू!

News Desk

महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला तुरुंगात टाकले तरीही मी तयार…

News Desk

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला! – पंकजा मुंडे

Aprna