HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू!

मुंबई | राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावावरून सध्या राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद सुरू आहे. आमदारांच्या त्या यादीच्या नावावर अजून शिक्कामोर्तब न झाल्याने राजभवनात भुतं आली का? अशी टीकाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांनतर राजभवनात री यादी सुरक्षित असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा संजय राऊत यांनी राज्यपालांना टोकलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 12 आमदारांच्या नावासंदर्भात इतके दिवस उलटूनही का निर्णय होत नाही? ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का? राज्याच्या मंत्रिमडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची ही नावे आहेत. त्यावर सहा-सात महिने निर्णय होत नाही. ही गोष्ट महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या लौकिकाला साजेशी नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांनी या गोष्टीचे भान ठेवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

12 आमदारांची यादी राजभवनात ‘सुरक्षित’

राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला महाविकासघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत चकार शब्दही काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती.

मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु झाले होते. अखेर गोपनीयतेच्या कारणामुळे राजभवनाला ही यादी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सचिवालयाकडून देण्यात आले होते. मात्र, आता 12 आमदारांची ही यादी राजभवनातच असल्याने राज्यपाल कोश्यारी त्याबाबत काही निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘पुन:श्च हरीओम’, ‘मिशिन बिगिन अगेन’ घोषणामुळे गोंधळ वाढला। देवेंद्र फडणवीस

News Desk

अनिल देशमुखांच्या विरोधात पुरावा नसताना गुन्हा दाखल

News Desk

राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित

swarit