HW News Marathi
महाराष्ट्र

भाई जगताप यांचा शिवसेनेवर ‘हा’ गंभीर आरोप

मुंबई | मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळे मलःनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प १५ वर्षांपासून रखडल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. शिवसेना आणि प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे एकीकडे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून दुसरीकडे दंडापोटी लाखो रुपये वाया जात असल्याची भूमिका भाई जगताप यांनी मांडली आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावरही भाई जगताप यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, भाई जगताप यांनी केलेल्या या आरोपामुळे आता शिवसेनेकडून काय उत्तर येणार हे पाहण महत्वाचे असणार आहे.

२००३ पासून मलनिःसारण प्रकल्पाची चर्चा चालू आहे. २०१७ मध्ये हा प्रकल्प होईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तरीही आता सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात आहे. याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला तब्बल २९.५ कोटीचा दंड ठोठावला. यावर मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयतून स्थगिती मिळवली यासाठी प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे. लवादाच्या दंडाला स्थगिती मिळवली असली तरी विनाप्रक्रिया पाणी सोडत असल्याने न्यायालयाने दरमहा दहा लाखांचा दंड ठोठावला आहे, त्यामुळे करदात्यांचे पैसा वाया जात आहे, असा आरोप भाई जगताप यांनी केली.

पंधरा वर्षांपासून कोणामुळे प्रकल्प रखडले आणि प्रकल्प रखडवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण, असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पर्शवभूमीवर काँग्रेस मुंबई शहरातील समस्यांवरुन शिवसेनेवर टीका करत असल्याचे चित्र आहे. डम्पिंग ग्राऊंड प्रकरणी देखील महापालिकेत शिवसेनेची सत्ता तर राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी निर्णय घ्यावा असे वक्तव्य भाई जगताप यांनी केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक

Aprna

नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका- मुख्यमंत्री 

News Desk

#Vidhansabha2019 : येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू | मुख्यमंत्री

News Desk