HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू | मुख्यमंत्री

मुंबई | “एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरुन तिढा असेल पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र युती होणार यावर आम्ही ठाम होतो. विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळणार असा विश्वास” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना-भाजप आणि महायुतीची आज (४ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

भाजप १५० शिवसेना १२४ आणि मित्रपक्ष १४ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला.युती झाल्याने अनेकांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातील महायुती प्रत्यक्षात उतरली आहे असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लोकसभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड प्रमाणात यश दिले.

दोन्ही पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू. जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना युतीच कोणतेही स्थान राहणार नाही. त्याला त्याची जागा दाखवून दिली जाईल, असा इशाराच फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत ते मुंबईतून सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होतील, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

लहानभाऊ मोठा हे सोडा आमचे नाते टीकून आहे – उद्धव ठाकरे

तसेच उद्धव ठाकरे यांनी लहान आणि मोठ्या भावाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की,लहान भाऊ मोठा भाऊ असे काही नसत भावाभावांमधील नात महत्वाच असत. नात कस आहे हे पाहिले जात. आता आमची युती झाली आहे.त्यामुळे सगळे प्रश्न बसून समजूतदारपणाने सोडवले आहेत. पुढील काही प्रश्नही असेच सोडवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री

दरम्यान, काही जणांनी बंडखोरी केली पुढच्या दोन दिवसांत जेवढे बंडखोर आहे त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्यात कुठेही बंडखोरी राहणार नाही, याकडे आम्ही लक्ष देऊन असे मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले. जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीच्या कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही, महायुतीच्या माध्यमातून त्याला त्यांची जागा दाखविण्यासाठी ताकद पणाला लावू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिला.

 

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेची पत्रकार परिषद

  • लहानभाऊ मोठा हे सोडा आमचे नाते टीकून आहे- उद्धव ठाकरे
  • हिंदूत्व शिवसेना-भाजपला जोडणारा धागा – मुख्यमंत्री
  • बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री
  • उमेदवारी न दिलेल्यांना नवीन जबाबदारी देणार – मुख्यमंत्री
  • भाजप १५० शिवसेना १२४ आणि मित्रपक्ष १४ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला – मुख्यमंत्री
  • आदित्य ठाकरे लवकरच आमच्यासोबत काम करतील – मुख्यमंत्री
  • आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार – मुख्यमंत्री
  • बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगणार – मुख्यमंत्री
  • बंडखोरी करणाऱ्यांना युतीत स्थान नाही – मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे १०४ व्या वर्षी झाले निधन

News Desk

रश्मी ठाकरेंचे वडिल माधवराव पाटणकरांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार, कॉंग्रेसची उद्या राज्यभर निदर्शन

News Desk