HW News Marathi
महाराष्ट्र

आदर्श सरपंच असलेल्या भास्कर पेरे पाटलांचा पराभव तर हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी झाली निवडणुक

औरंगाबाद | राज्यात आज (१८ जानेवारी) ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. दरम्यान परस्पर विरोधी बातम्या समोर आल्याने आश्चर्यचकित व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये आदर्श सरपंच म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेले भास्कर पेरे-पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

बिनविरोधची परंपरा खंडित झालेल्या आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी निवडणूक झाली व त्यांच्या पॅनलने एकहाती सत्ता काबीज केली आहे. पेरे पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. औरंगाबादेतील आदर्श गाव असलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीची निकाल हाती आले असून, या निवडणुकीतून भास्कर पेरे पाटील यांनी माघार घेतली होती.

तर भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे या निवडणुकीत उभ्या होत्या. मात्र, यात त्यांच्या मुलीचा म्हणजे अनुराधा यांचा पराभव झाला आहे. एकीकडे वडील भास्कर पेरे पाटील यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असुन मुलीचा देखील पराभव झाला आहे.

पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे ३० वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केला होता. दरम्यान या ग्रामपंचायत निकालामध्ये पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक फारच चुरशीची झालेली दिसून आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जळगावात भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल, निवडणुकीच्या आधीच भूकंप

News Desk

अर्णब गोस्वामींसाठी राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना, कुटुंबीयांना भेटू देण्याचे दिले निर्देश

News Desk

‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna