HW News Marathi
महाराष्ट्र

…..या चार अटींवर भुजबळांना जामीन मंजूर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने

त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळाचे वाढते वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेत पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर

  • तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणे
  • खटला सुरु असताना साक्षीदारांना प्रभावित न करणे
  • पासपोर्ट जमा करणे
  • तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतंच रद्द केले होते. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी मागणी करत 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे, नारायण राणेंचा सरदेसाईंना सल्ला

News Desk

मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

News Desk

“खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा”, विजय वडेट्टीवारांचा पडळकरांवर पलटवार!

News Desk
महाराष्ट्र

भुजबळांचा तुरुंगवास हे एक राजकीय षडयंत्र

News Desk

मुंबई : छगन भुजबळांना भोगावा लागलेला तुरुंगवास हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला.

भुजबळांना जामीन मंजूर झाल्यास या प्रकरणातील साक्षीदारांवर त्यांच्याकडून दबाव आणला जाऊ शकतो, असा दावा सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आला होता. मात्र कोर्टाने हा युक्तीवाद अमान्य केला. यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केले. ‘आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत नाही. मग आम्ही कुठून आणि कसा काय दबाव आणणार?,’ असा सवाल सुळेंनी उपस्थित केला.

 

Related posts

Cyclone Tauktae : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांतही चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा

News Desk

INS विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा केलेला नाही! – किरीट सोमय्या

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मंत्रालय कर्मचाऱ्यांशी भेट

Aprna