HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर नवे संकट! परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यु

परभणी | कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आता बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. परभणीमधील मुरंबा गावात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.परभणी येथील मुरंबा गावामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये ८०० कोंबड्या मृत्य अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला, अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्षांची नमुने, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला, असे आता निष्पन्न झाले आहे.

देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.

कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे आदेश देण्यात आले असून, दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी #KaroNaSalaam अभियानाचे कौतुक केले

News Desk

क्रीडा, कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

News Desk

भाजपला माझ्याकडे राजीनामा मागण्याचे नैतिक अधिकार नाही, यशोमती ठाकूर यांचा चंद्रकांत पाटलांना पलटवार

News Desk