HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील पाटोदा तालुक्यात मुलींचा जन्मदर घसरला, पंकजा मुंडे संतापल्या

बीड | स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात बीड जिल्ह्याचे नाव देशात गाजले होते. आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत्य कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कोव्हिड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचे समोर आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात १ हजार मुलांमागे केवळ 764 मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे PCPNDT च्या अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी सांगितले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे भीषण सत्य त्यांनी मांडले.

दरम्यान, या प्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना म्हणाल्या, “मुलींच्या घटत्या जन्मदरा विषयी चिंत व्यक्त करत जिल्ह्यातील प्रशासनाच्या कारभारावर मुलींना नाकारले जात असल्याने जिल्हयात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तर बीड जिल्ह्यातील चालत असलेल्या आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही, असे सांगत मुलींचा जन्मदर पुन्हा वाढविण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”

“२००९ साली जेव्हा मी राजकारणात आले, तेव्हा जिल्हयात मुलींचा जन्मदर राज्यात सर्वात कमी होता. या गोष्टीविषयी मनात तीव्र दुःख बाळगून यावर एनजीओच्या माध्यमातून मी खूप काम केले. जेव्हा महिला बालविकास मंत्री आणि जिल्हयाची पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली तेव्हा मी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी पहिली योजना जाहीर केली आणि याचा चांगला परिणाम होऊन जिल्हयात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९६१ मुली असा झाला होता. जन्मदराचे अत्यल्प प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झाले, पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन ठेवण्याचे काम आताच्या कारभारामुळे होत आहे. याचा मी तीव्र निषेध आणि नापसंती व्यक्त करते, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.”

बीड जिल्हयात गेल्या दोन वर्षांत पीसीपीएनडीटी ॲक्टचे व्यवस्थित पालन न झाल्याने मुलींचा जन्मदर घटला असल्याचे यावरून दिसत आहे. याचा अर्थ मुलींना नाकारले जात आहे. कुठेतरी अशा घटना घडत आहेत आणि यावर कुणाचीही वचक, अंकुश राहिला नाही. जिल्हावासियांना मी आवाहन करते की, जसे आपण ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला खूप छान प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद पुन्हा द्या. प्रबोधन, जनजागृतीमध्ये सर्वांनी सहभाग घ्या, जिल्हयाचे हे चित्र पुन्हा दिसू नये. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

संबंधित व्हिडिओ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षांतराची भाकरी करपण्यास शरद पवारच जबाबदार !

News Desk

महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील

News Desk

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली मंत्रिपदाची मागणी… सुप्रिया सुळे अजित पवारांशी बोलणार !

News Desk