HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड राजीनामा देत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही ! भाजप आक्रमक

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने अडचणीत येत असून या प्रकारामुळे आता महाविकासआघाडी सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपही या प्रकरणी आक्रमक झाला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकासआघाडी सरकराची कोंडी होण्याची शक्यता आहे. “वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”, असा स्पष्ट इशारा भाजपने दिला आहे. भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

अतुल भातखळकर यांनी याबाबत इशारा देत थेट एक व्हिडीओच शेअर केला आहे. अतुल भातखळकर आपल्या या व्हिडिओत म्हणतात कि, “वनमंत्री संजय राठोड हे अधिवेशनापूर्वी राजीनामा देणार या समाजमाध्यमांत आणि प्रसारमाध्यमांमध्ये पेरलेल्या बातम्या म्हणजे आपला सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्याचा निलाजरा प्रयत्न आहे. मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर एवढंच यामागचे लॉजिक आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा राजीनामा येण्याची वाट बघण्याची गरज नाही. मुख्यमंत्री कधीही मंत्रिमंडळातून एखाद्याची हकालपट्टी करू शकतात. परंतु, मुख्यमंत्र्यांना यातले काहीही करायचे नाही”, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हे आरोप करत याचसोबत अतुल भातखळकर यांनी महाविकासआघाडी सरकारला थेट इशारा दिला आहे. “जोपर्यंत वनमंत्री संजय राठोड राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही”, असे अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेही तीव्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याचप्रमाणे, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागेल अशाही चर्चा आहेत. त्याचसोबत, भाजपने हा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेसाठी लाचारी म्हणजे नारायण राणे”- विनायक राऊत

News Desk

शिवरायांना खरी आदरांजली वाहायची असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा – विखे-पाटील

News Desk

“पंकजांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या का?”; धनंजय मुंडे म्हणाले, “नाही, पण…”

News Desk