HW News Marathi
देश / विदेश

भाजपमध्‍ये प्रवेश करणे हाच राहुल गांधींसमोर शेवटचा पर्याय, निलेश राणेंनी डिवचलं

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकीच्या आधी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे युवा नेते जितिन प्रसाद यांनी आज (९ जून) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू अशी त्‍यांची ओळख होती. जितीन यांच्या जाण्याने काँग्रेसला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसल्‍याचे मानले जात आहे.
यावरुन खासदार भाजप नेते निलेश राणे यांनी या मुद्दावरून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

निलेश राणे म्हणाले की, राहुल गांधींच्या सगळे जवळचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं हा त्‍यांचा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे, असेही राणे म्‍हणाले. यावर आता कॉंग्रेसकडून काय पलटवार येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, आज उत्तर प्रदेशमधील युवा नेते जितीन प्रसाद काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांना गेल्या काही काळापासून काँग्रेसने दुजाभाव दाखवला होता. जितीन यांनी पक्ष सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.प्रसाद हे ब्राह्मण समाजाचे मोठे नेते होते. प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत, अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. या जी-२३ गटाने जे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले होते त्यात प्रसाद यांचा समावेश होता. प्रसाद यांच्यावर पश्चिम बंगाल निवडणुकीची जबाबदारी होती. मात्र, तेथे काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. याची चर्चा सध्या पक्षीय पातळीवर सुरू होती. त्यात जी २३ गटात प्रसाद यांचा समावेश असल्याने त्यांचे पक्षनेतृत्वाशी फारसे पटत नव्हते.

जितिन प्रसाद यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. क़ॉंग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी आज (९ जून) केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थित त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान, यावेळी जितीन प्रसाद यांनी कॉंग्रेस का सोडली याचं कारण दिलं आहे. माझे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हणजे भाजप. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत, असे जितिन प्रसाद यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य यांनीही कॉंग्रेसला रामराम करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारावीच्या विद्यार्थ्यांचा दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार!

News Desk

‘५४ कारखान्यांचीही चौकशी झाली पाहिजे’, चंद्रकांत पाटील अमित शहांना लिहिणार पत्र

News Desk

एकहाती सत्तेचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील ! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

News Desk