HW News Marathi
देश / विदेश

उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलेल्या ‘त्या’ दोन भुतांचा देवावर विश्वास नाही !

मुंबई । “राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे देवावर विश्वास नसलेली भुतं”, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (२९ ऑगस्ट) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपने आज राज्यभर ‘घंटानाद’ आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष केले आहे. “उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलेल्या या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही. त्यामुळेच तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे लागेल”, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी ही बोचरी टीका केली आहे.

सांगलीतील मिरजेत “दार उघड उद्धवा दार उघड” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे घंटानाद आंदोलन झाले. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला. “राज्य सरकारने दारूची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी दिली. मग मंदिरं खुली करायला परवानगी का नाही ?”, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राज्यातील मंदिरे तातडीने खुली करावीत, अशी आक्रमक मागणी करत भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडीकडून राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. बुलढण्यातील संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरातून भाजपच्या ‘या’ आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. राज्यातील गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते, आमदार, नेतेमंडळींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची तारीख जाहीर!

News Desk

गांधी हा एक परिवार नसून या देशाचं DNA आहे – यशोमती ठाकूर 

News Desk

पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !

News Desk