HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे नगसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देणार !

पुणे |महाराष्ट्रातील विविध भागात महापुराने नुकसान झालेल्या भागासाठी आर्थिक मदत म्हणून पुणे महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागास देणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली, पुणे या जिल्ह्यातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवितहानी बरोबरच शेतीचे, उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असंख्य लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. कोरोनासारख्या संकटाला तोंड देत असताना आलेली ही आपत्ती वेदनादायी आहे. कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष हा मन पिळवटून टाकणारा आहे. त्यांच्या या जगण्यासाठीच्या संघर्षात खारीचा वाटा म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार सर्व सभासदांनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचं मानधन पुरग्रस्तांना देणार, अजित पवारांची घोषणा

पमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तिथली पाहणी करून त्यांनी लोकांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. राज्यात 9 जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा थोडा भाग बाधित झाला आहे. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

प्रत्येकाला मदत केली जाणार

सांगलीत पहिल्यांदा इतका जोरदार पाऊस पडला आहे. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या मागण्या ऐकुन घेतल्या आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचं काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही. दोन दिवसांत पूरस्थितीचं चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मिळून आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या नावे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा सरकारचा विचार

News Desk

राऊतांचा गौप्यस्फोट! नवनीत राणांनी दाऊदशी संबंधित ‘या’ व्यक्तीकडून घेतले ८० लाखाचे कर्ज

Aprna

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणारच; १६ अटी शर्थीसह मिळाली परवानगी

Aprna