HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडतायत, गुगलीचीही गरज नाही !

मुंबई | ठाकरे सरकारमध्ये अडचणींची मालिकाच सुरु झाली आहे. ठाकरे सरकारमध्ये एका पाठोपाठ एक २ मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस अनेक मुद्द्यांवरून भाजपकडून देखील राज्य सरकारची कोंडी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आणखी एका भाजप नेत्याने ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावला आहे. “सध्या राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या पडत असलेल्या सर्व हिट विकेट असून त्यासाठी कोणी गुगलीही टाकायची वेळ आलेली नाही. आता ओपनिंग बॅट्समनच्या विकेट पडल्यात तशा हळूहळू बाकीच्याही जाणारच आहेत”, अशी सणसणीत टोला भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.

राज्यात सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा आहे. हि लढत राष्ट्रवादी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. याच पार्श्वभूमीवर, हर्षवर्धन पाटील यांनी गादेगाव येथे भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले कि, कोणी ऑन ड्युटी असलेले पोलीस आयुक्त जेव्हा पत्र लिहून एवढे गंभीर आरोप करतात. तेव्हा या सरकारने या गोष्टीचं गांभीर्य ओळखायला हवे होते. या सरकारची विश्वासहार्यता आता गेली आहे.”

कोणाला कसा मार बसतोय, कोण कोणाचे नाक दाबतंय…!

हर्षवर्धन पाटील यापुढे बोलताना म्हणाले कि, “कोणाला कसा मार बसतोय, कोण कोणाचे नाक दाबतंय, कोण कसे फरफटत चाललंय, कोण कोणाचे तोंड दाबतंय आणि कोण कोणाचा गाला दाबततंय, ते रोज आपण बघतोय. महाविकासआघाडीत सध्या कोणालाच कोणाची गॅरंटी नाही. कोणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही”, असाही टोला यावेळी पाटील यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार जाणून घ्या…

News Desk

नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे असल्याचे यांनी म्हटले असते- धनंजय मुंडे

News Desk

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रातून प्रतिसाद

News Desk