HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार!

मुंबई | राजकीय वातावरणात सध्या शिवसेना विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे असा वाद सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेने कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नारायण राणेंना अटक करून त्यांना जमून देखील मिळाला आहे, मात्र आता शिवसेना भाजप असा वाद पेटून उठला आहे. असं असतानाच बुधवारी भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या विरोधात भाजपने तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी राणेंनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून राणे यांच्याविरुध्द जातीय तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे अशा विविध कलमांन्वये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच साबर पोलीस स्थानकामध्ये आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि वरुन देसाईंविरोधात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

वरून सरदेसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या

दुसरी तक्रार सुनील रघुनाथ केदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात दाखल करण्यात आली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये योगी असताना आदित्यनाथ मुख्यमंत्री कसे झाले त्यांनी एखाद्या गुहेमध्ये जाऊन ध्यान साधना करायला हवी.

तसेच योगी यांना चप्पलांनी मारण्याची भाषा या व्हिडीओत केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तसेच योगी हे केवळ भाजपाचे नेते किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नसून गोरखपूर मठाचे महंत असल्याने असं वक्तव्य करुन मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळेच उद्धव यांच्याविरोधात कलम १५३ अ (१), १५३ (ब), १८९, २९५ अ. ५०४, ५०५ (२) आणि ५०६ अंतर्गत तक्रार दाखल करावी असं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही! – सुप्रिया सुळे

Aprna

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात मोठा  दावा

News Desk

शाळांमध्ये ‘या’ तारखेला आजी आजोबा दिवस साजरा होणार; दीपक केसरकरांची माहिती

Aprna