HW News Marathi
महाराष्ट्र

“देर आए, दुरुस्त आए”, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा टोला

मुंबई | राज्यात आजी आणि माजी मुख्यमंत्री परतीचा पाऊस आणि पुरामुळे काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करत आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी “देर आए, दुरुस्त आए”, असा टोला मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडून बांधावर गेल्याने शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

“विश्वासघाताने तयार झालेले हे सरकार आत्मविश्वास विरहीत आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आत्मसन्मानाची भावना असणे सोईचे नाही. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलेल्या नाराजीविषयी आशिष शेलार यांना विचारले असताअमित शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांनी टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगत शेलार यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, आता मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनाही भेटणार!

News Desk

आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- प्रविण दरेकर

News Desk

शरद पवारांची गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट!

News Desk