HW News Marathi
Covid-19

कोणत्याही गोष्टीच गांभिर्य नाही शेवटी बालिश बुद्धी आहे, ‘हे’ परत सिद्ध करून दाखवल !

मुंबई | “कोरोना संदर्भात मीटिंग चालू असताना कोपऱ्यात एका बाजूला आदित्य ठाकरे मोबाईल मध्ये व्यस्त आहे. याला कोणी protocol काय असतो तो सांगा. कोणत्याही गोष्टीच गांभिर्य नाही शेवटी बालिश बुद्धी आहे हे परत सिद्ध करून दाखवल,” असे ट्वीट भाजपचे नेते निलेश राणे यांनी करत राज्याचेपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलविलेल्या बैठकीत मोबाईलमध्ये पाहाताना दिसत आहे. यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेला कोणत्याही गोष्टीच गांभिर्य नाही शेवटी बालिश बुद्धी आहे हे परत सिद्ध करून दाखवल, असा टोला लगावला आहे. नितेश राणेंच्या टीकेला आदित्य ठाकरे काय उत्तर देतील, हे पाहाणे महत्त्वाचे असेल.
लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत काल (१५ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गेल्या सुमारे ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल ७८२७ नवे रुग्ण आढळले, तर ३३४० जण झाले कोरोनामुक्त

News Desk

वारंवार आणि विनाकारण केंद्राकडे बोट दाखविणे योग्य नाही !

News Desk

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk