HW News Marathi
महाराष्ट्र

संतोष परब यांच्यावर हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयासमोर शरण

मुंबई | शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे हे कणकवली न्यायालयात शरण आले आहेत. न्यायालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. राणे शरण गेल्यानंतर त्यांना न्यायालयीने आज (२ फेब्रुवारी) कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सरकारी वकिलांनी नितेशे राणेंना पोलीस कोठडीची मागणी केली होती. सरकारकडून बेकायदेशीररित्या अटकेचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, शरण जाण्याआधीच नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणेंना पोलीस कोठडीची गरज नाही. आणि त्यांना पोलिसांच्या तपासाला सहकार्य केले आहे. नितेश राणेंचा वकिलाचा न्यायालयात युक्तीवाद केला.

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पण, न्यायालयाने नितेश राणेंना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राणे हे सिंधुदुर्ग सत्र न्यायालयासमोर शरण जाण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने राणेंना अटक पूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, जिल्हा सत्र न्यायालयाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. यानंतर राणेंना अटकेची टाकती तलवार होती. राणेंनी आज कणकवली दिवानी न्यायालयासमोर शरण आले.    

दरम्यान, नितेश राणेंना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली. तर राणेंच्या वकिलांनी नितेश राणेंना पोलीस कोठडीची गरज नाही. आणि त्यांना पोलिसांच्या तपासाला सहकार्य केले आहे. नितेश राणेंचा वकिलाचा न्यायालयात युक्तीवाद केला. न्यायालय जो निर्णय देईल, त्यांचा आम्ही आदर ठेवून आता शरण जात आहे. सरकारकडून बेकायदेशीररित्या अटकेचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, शरण जाण्याआधीच नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.

न्यायालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी राणेंंचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. जामीन अर्ज फेटाळल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर येऊन आपल्या गाडीमध्ये बसले. मात्र, त्यांची गाडी पोलिसांनी अडवून ठेवल्याने निलेश राणे चांगलेच संतापले आणि गाडी का अडवली असा जाब ते थेट पोलिसांनाच विचारु लागले.

नेमके काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा, सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

News Desk

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डीमध्ये ५ वर्षीय अल्पवयीन बालकाची निर्घृण हत्या

News Desk

‘आता पेट्रोलही १०५ वर थांबेल’, रोहिणी खडसेंचं सूचक ट्विट

News Desk