HW News Marathi
महाराष्ट्र

एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर, राणेंचा गंभीर आरोप

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना ठाकरे सरकार पाठबळ देत असल्याचा घणाघात राणे यांनी केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त होतं. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. त्यावरुन राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे

ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ, ताकद देत आहे. इथं कुंपणच शेत खात आहे. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणात तेच होत आहे. हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर बलात्कार, हत्या सारखे गंभीर आरोप झाले. पण ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचं काम सुरु असल्याची टीकाही राणेंनी केलीय. त्याचबरोबर या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय? असा सवालही राणेंनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : “महाराष्ट्र उद्धव ठाकरेंपासून संकटमुक्त व्हावे, 14 तारखेला दिल्लीच्या हनुमान मंदिरात महाआरती होणार” – नवनीत राणा

Aprna

मेट्रो कारशेडबाबत खूल्या चर्चेला या!आदित्य ठाकरेंना भाजप नेते आशिष शेलार यांचे जाहीर आवाहन

News Desk

‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Aprna