HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : “महाराष्ट्र उद्धव ठाकरेंपासून संकटमुक्त व्हावे, 14 तारखेला दिल्लीच्या हनुमान मंदिरात महाआरती होणार” – नवनीत राणा

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाचे कलम १२४ (अ) तुर्तास स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर एच. डब्ल्यू. मराठीने आज (११ मे) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याशी खास बातचीत केली आहे. यात नवनीत राणांनी राजद्रोह कलम, महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “आमच्या महाराष्ट्र उद्धव ठाकरेंपासून संकटमुक्त व्हावे. म्हणून  १४ तारखेला आम्ही दिल्लीत संकटमोचनाच्या मंदिरामध्ये सकाळी ९ वाजता आरती करणार आहे,” अशी टीका नवनीत राणांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच  “नवनीत राणा थांबण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी आलेली आहे. यात काही शंका नाही. मला कोणी थांबवण्याचा प्रयत्न करू नये. आणि तसे केल्यास मी तेवढ्याच ताकतीने परत उभी राहीन,” असा आत्मविश्वास त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या राजद्रोहाचे कलम १२४ (अ) तुर्तास स्थगिती निर्णयाकडून दिलासा मिळाला का? यावर एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या खास मुलाखती नवनीत राणा म्हणाले, “हे फक्त माझ्यासाठी दिलासादायक बाबा नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने राजद्रोह कलमचा चुकीच्या पद्धतीने वापर होत होता. ज्या लोकांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या लोकांसाठी न्यायालयाच्या निर्णायमुळे या लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, भविष्यामध्ये बोलण्याचे स्वातंत्र कुठेही राहिले नसते. जर प्रत्येक लोकांवर अशा प्रकारची कारवाई झाली असती. माझ्यावर जी महाराष्ट्रात कारवाई झाली, हनुमान चालिसा वाचणार म्हणून माझ्यावर १२४ (अ) लावण्यात आला. केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. जूनपर्यंत देशातील कोणत्याही राज्याने या कलमाचा वापर करू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे.” 

आम्ही त्यांना पोपट आणि मामा पण बोलतो, नवनीत राणांचा राऊतांना टोला

 “मी आजही दिल्लीत आहेत. आमच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे संकट रुपी आहेत. ते संकट मुक्त व्हावे, म्हणून १४ तारखेला आम्ही संकटमोचनाच्या मंदिरामध्ये सकाळी ९ वाजता आरती करणार आहे, असे १४ मे रोजी महाराष्ट्रसोडून तुम्ही दिल्लीत हनुमान चालिसा पठण करणार, या प्रश्नावर नवनीत राणा उत्तर दिले. पुढे नवनीत राणांना पत्रकार परिषदेत शकुनी आणि दुर्योधनचा उल्लेख केला, तुम्ही हे कोणाला उद्देशून बोलात हे सांगाल का? असा प्रश्नावर नवनीत राणा म्हटल्या, “मला असे वाटते की, कोणाला काही सांगण्याची गरज वाटत नाही. ते राज्यसभा सदस्य आहेत. आम्ही त्यांना पोपट आणि मामा पण बोलतो,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. 

 नवनीत राणा थांबण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी आली

उद्धव ठाकरेंविरोधात तुम्ही निवडणूक लढवणार आहात, तर यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारी करणारी केली आहात, या प्रश्न विचारल्यावर नवनीत राणा म्हणाले, “मी तेव्हाही म्हटले आणि आजही म्हणते की, १४ तारखेला मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. कारण आपल्या कुटुंबियांचे नाव घेऊन, कोणीही मोठ्या पदावर येवू शकतात. पण स्वत: रक्ताचे पाणी करून पदावर येणे, का म्हणतात. हे तेव्हाच कळते, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये उतरुन त्यांची सेवा करून, त्यांचे प्रश्न मांडून आणि त्यासाठी भांडून सत्तेच येतात. तेव्हाच माहिती पडते की निवडणुका कशाला म्हणतात. आणि रक्ताचे पाणी कशाला म्हणतात. म्हणून मी त्यांना स्पष्ट आव्हान केले आहे. तुम्ही कोणताही मतदारसंघ निवडा, त्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात मी निवडणूक लढवणार. नवनीत राणा अशीच लढत राहणार, या प्रश्नावर त्या म्हटल्या, नवनीत राणा थांबण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी आलेली आहे. यात काही शंका नाही. मला कोणी थांबवण्याचा प्रयत्न करू नये. आणि तसे केल्यास मी तेवढ्याच ताकतीने परत उभी राहीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग! – उपमुख्यमंत्री

Aprna

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित सतिश चव्हाण यांच्या मागणीला मिळणार यश!

News Desk

तृप्ती देसाईंना हवे शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्षपद !

News Desk