HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या माधव भंडारी यांची मंत्री पदी वर्णी

मुंबई | भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी भंडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. माधव भंडारी हे समितीचे अध्यक्ष मदत आणि पुनर्वसन मंत्री असतील तर त्यात सदस्य म्हणून महसूल, वने, ऊर्जा, उद्योग आणि वित्त मंत्री तसेच या विभागाचे सचिव असतील.

गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भंडारी यांचे नाव आघाडीवर होते. पण, त्यांना डावलून राष्ट्रवादीतून उमेदवार प्रसाद लाड यांना तिकीट देण्यात आले होते. भंडारी यांना वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. भुसंपादन प्राधिकरणाचे पुनर्गठन करून माधव भंडारी यांची राज्यमंत्री दर्जा देवून नियुक्ती करण्यात आलीये.

माधव भंडारी यांचा अल्प परिचय

माधव भंडारी यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले असून माधव भंडारी यांच्यावर बालपणापासून संघाचे संस्कार झाले. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध कामांमध्ये सहभाग झाले होते. छात्रशक्ती ह्या अभाविप मुखपत्राच्या संपादन कार्यातून वृत्तपत्रीय जीवनाची सुरुवात असून १९७५ ऐन आणीबाणीच्या काळात त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात प्रवेश केला. १९८० ते १९९० मध्ये भारतीय जनता पार्टीचे काम पूर्ण वेळ पाहण्यास सुरुवात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘गुडन्यूज’, ३४ जणांना दिला डिस्चार्ज

swarit

मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम नको, मराठा संघटनांना सोबत घेत भूमिका मांडण्याची गरज! – राधाकृष्ण विखे-पाटील

News Desk

सुरक्षा कमी करण्याचा  निर्णय हा सरकारचे “खुजेपण” दाखवणारा – मनसे 

News Desk
मुंबई

माई आंबेडकर सभागृहाचे रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन

News Desk

मुंबई | सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे दिवंगत डॉ. माई आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सभागृहाचे आणि जीवक रुग्ण सेवा प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष विवेक पवार ;जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; भीम छाया सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष प्रकाश मोरे ; तसेच पत्रकार हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत डॉ माई आंबेडकर यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान कायम होता. महापरिनिर्वाणानंतरही डॉ बाबासाहेब अमर असल्याचे सांगत माई या कुंकू लावीत असत. मात्र त्याकाळात डॉ माईंवर आरोपबाजी करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. मात्र दलित पँथर च्या चळवळीने डॉ माई आंबेडकर यांच्यावरील अन्याय दूर केला.

पँथर नेते विचारवंत राजा ढाले यांनी अभ्यास करून डॉ माई आंबेडकरांवर झालेले आरोप चुकीचे असल्याची भूमिका मांडली होती. डॉ माई आंबेडकरांना काही वाईट करायचे असते तर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वीच केले असते मात्र त्यांनी तसे केले नाही. डॉ माई आंबेडकरांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मनोभावे सेवा केली होती असे प्रतिपादन रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना केले.

Related posts

चेंबूरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk

विकासकांचा ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

News Desk

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

News Desk