HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधानांचा बाप काढणारे आज अर्णब गोस्वामींना उपदेश करतायत !

मुंबई | “पंतप्रधानांचा बाप काढणारे अर्णब गोस्वामी यांना सभ्य भाषेत बोलण्याचा उपदेश करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान जर राज्यात अपमान असेल तर पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशांचा अपमान नव्हता का?” असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचा केला आहे. काल (९ ऑगस्ट) सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एकेरीत उल्लेख केला होता, त्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावरून अतुल भातखळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“टाईम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून रोखठोक मधून टीका करण्यात आली. ज्यांना प्रधानमंत्र्यांचा बाप काढला, ज्यांना अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये वारंवार आमच्यासारख्या विरोधकांच्या उल्लेख केला. त्यांना नितीमत्तेची आठवण येत आहे. आणि त्यांना सभ्यतेची आठवण येत आहे, हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अर्णब गोस्वामी हे हिंदीमध्ये काय बोलले आणि इंग्रजीमध्ये काय बोलले हे बघण्याचे आवश्यकता आहे.आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं अत्यंत हास्यास्पदच आहे. जनमनावर निवडीन आलेले हे मुख्यमंत्री नाही आहेत. जनतेचा विश्वासघात करुन झालेले मुख्यमंत्री आहेत, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावे”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…नाहीतर भागवत कराडांच्या शपथविधीला गेले असतेच”, पंकजा मुंडेंचं विधान

News Desk

तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती, राऊतांचा पाटलांना टोला

News Desk

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही – शरद पवार

News Desk