HW News Marathi
महाराष्ट्र

जर आपण कवडीमोलाची किंमत नसलेल्या नातवाचं ऐकलं असतं तर…अतुल भातखळकरांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले. तसेच, २०१४ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. मात्र अद्यापही योग्य न्याय न मिळाला नाही. याची पुनरावृत्ती होणार नाही’, असे त्यांनी ट्विट करत सीबीआयला सुनावले आहे. यावरून, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सुशांतसिंग राजपूतचे प्रकरण डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणासारखे होणार नाही असे खोटक विधान शरद पवारांनी आज केले. शरद पवारांना मी आठवण करुन देऊ इच्छीतो डॉ नरेंद्र दाभोळकरांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर तब्बल १४ महिने राज्यात तुमच्याच पक्षाचे सरकार होते आणि तुमच्याच पक्षाचा गृहमंत्र्यांनी होते. या १४ महिन्यांच्या कालखंडामध्ये पुरावे नष्ट करण्याचे काम झाले, असेही सीबीआयचे म्हणणे आहे”.

“त्यामूळे, शरद पवारजी जर का आपण कवडीमोलाची किंमत नसलेल्या नातवाच ऐकले असते तर अशा खोचक पद्धतीने आणि खोटं बोलण्यावर पाळी आज आपल्यावर आली नसती.आता सीबीआयकडे तपास गेला आहे. सीबीआय १०० टक्के त्याचा तपास लावेल याची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला खात्री आहे,” असे अतुल भातखळकर यांनी शरद पवारांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी बँकेच्या संदर्भात कधी कोणता निर्णय घेतील सांगता येत नाही – अजित पवार

News Desk

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा ‘या’ कारणामुळे रद्द

Aprna

जळगावात शिवसेना महिला कार्यकर्त्यांची दादागिरी आली समोर!

News Desk