HW News Marathi
महाराष्ट्र

राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मागितला पाहिजे, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा  

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर टीका करणे सुरु झाले. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यांनतर कायमच ठाकरे सरकारवर टीका करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा मागितला पाहिजे. आंधळा आणि भैरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसात कोण दबाव टाकत होतं. एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं म्हणून राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे”, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारने सीबीआयला सहरार्य करावे असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील – ‘जन्माला यावे तर कर्नाटकात’

swarit

नवाब मलिकांचा शिवसेनेला टोला ‘करून दाखवले’

News Desk

पुणे शहरातील वाहतूक ३१ मार्चपर्यंत पुर्णपणे बंद

swarit