HW News Marathi
Covid-19

“घरात दोन करोना पॉझिटिव्ह, तरी मुख्यमंत्री ‘त्या’ सोहळ्याला उपस्थित कसे ?” भाजपचा सवाल

मुंबई । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काहीच दिवसांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. मात्र, आता भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्याच या कार्यक्रमातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण, काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती.

हाच धागा पकडत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. अतुल भातखळक आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की “मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा.”

बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर, अतुल भातखळकर यांनी थेट ठाकरे कुटुंबालाच धारेवर धरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

किरीट सोमय्यांनी कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या घटनांची चौकशीसाठी आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk

भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

केंद्राच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार, १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली !

News Desk