HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनची भीती अजूनही टळली नाही – मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी मी तुम्हाला घाबरावयला आलो नाही आहे तर राज्यात कोरोना स्थिती काय आहे याबद्दल सांगायला आलो आहे.

मुख्यमंत्र्यानी यावेळी म्हटलं की, लॉकडाऊनची शक्यता अजूनही टळली नाही. मात्र, या संकटातून मार्ग काढण्यासाठी संवाद साधत आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो. सण, उत्सव, मोर्चे करायला लागलो. दरम्यान, लग्न समारंभ, रॅली यामुळे राज्यात कोरोना वाढला. कोरोनाचे आक्राळ विक्राळ रूप समोर आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :

* घाबरू नका ! मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

* परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल याबाबत विचार करण्यासाठी संवाद

* गेल्यावर्षी याच काळात देशात कोरोनाचा शिरकाव झाला होता.

* परिस्थिती अशीच राहिली तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल! ही शक्यता अजून टळलेली नाही

* तुम्हा सर्वांनी माझे ऐकले. मात्र, मधल्या काळात मात्र आपण शिथिल झालो. सर्वकही कोरोना गेल्यासारखेच सुरू झाले

* आधीच्या तुलनेने कोरोनाचे आताचे रूप अतिशय भयानक आहे.

* मुंबईत दरदिवशी ५० हजार चाचण्या. राज्यात दरदिवशी १ लाख ८२ हजार चाचण्या

* राज्यात चाचण्यांच्या संख्येचे लक्ष्य अडीच लाख आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात २४ तासांत ४० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त

News Desk

ज्यांचा पराभव होणार असतो ते आधीच तयारी करतात…! जयंत पाटलांनी डिवचलं

News Desk

राजधानी दिल्लीत विकेंन्ड कर्फ्यू, अरविंद केजरीवालांची घोषणा

News Desk