HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार आणि अनिल परबांची CBI चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचे थेट अमित शहांना पत्र

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची CBI चौकशी करावी, अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये याबाबतचा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसं निवेदन पाठवले आहे.

सचिन वाझेच्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचेही नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी पवार आणि परब यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत करण्यात आला. या ठरावामुळे अजित पवारही भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. त्यामुळे आता अमित शाह यावर का बोलणार? अजित पवारांच्या अडचणीत वाढ होणार काय़ हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि परब यांचीही करावी, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणार्‍यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे धक्‍कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहेत, असा आरोपही या ठरावात करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गळाभेटीचे कारण काय…?

News Desk

कोल्हापूर पालिकेतील १९ नगरसेवकांचे पदे रद्द

swarit

पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा! – अजित पवार

Aprna