HW News Marathi
महाराष्ट्र

‘राष्ट्रपती राजवटी’वरून शिवसेना जनतेची दिशाभूल करते, राम कदमचा राऊतांवर आरोप

मुंबई | “राष्ट्रपती जवटीच्या वक्तव्यावरून शिवसेना राज्यातील जनतेची दिशाभूल करते,” असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. मात्र, “राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेले विधान हे संविधानातील कायदेशीर प्रक्रिया सांगणे, यात गैर काय, असा उलटा सवाल राम कदम यांनी राऊत यांना केला आहे.

राम कमद पुढे म्हणाले की, “जर ९ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, ही संविधानातील कायदेशीर प्रक्रिया सांगणे ही काही धमकी आहे, असे म्हणने हे पूर्णपणे गैर, असत्य आहे, असे म्हणत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे.

शिवसेना राष्ट्रपती राष्ट्रजवटीच्या वक्तव्यावरून राज्यातील दिशाभूल करणारे आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुताला दिलेला जनादेश आहे, असे देखील राम कदम म्हणाले. “महाराष्ट्रच्या जनतेच्या मनामनामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवी मुख्यमंत्री व्हावे, आणि महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, असा जनादेश आहे. महायुतीतील सर्वच घटक पक्ष, जनतेच्या महाजादेशाचा सन्मान करत, राज्यात सरकार स्थापन करतील, ” असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला आहे.

संरक्षण करणे ही माझी जबाबदारी | मुनगंटीवार

वाघाचे संवर्धन करणे, त्यांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, असा टोला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. राज्यात सरकार जर विशिष्ट मर्यादेपर्यंत स्थापन न झाल्यास काय होईल, यावर घटनेतील तरदूत मी पत्रकारांना सांगितली. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे ही धमकी असा प्रश्न उपस्थित होत नाही. गेल्या पाच वर्षात मी युती कायम राहवी, मन जुडावी यासाठी काम केले आहे. माझी भाषाही तोडणार कधीच राहिली नाही. शिवसेना- भाजप यांचा संबंध जोडावा अशीच राहिली असल्याचा दावा देखील मुनगंटीवार यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार

News Desk

आम्ही सत्तेसाठी भुकेलो नाही !

News Desk

बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार

News Desk