HW News Marathi
महाराष्ट्र

स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे!; उदयनराजेंचा रोख कुणावर?

सातारा । भाजप खासदार उदयनराजे भोसले सातारा स्टेडियमच्या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झाले आहेत. “साताऱ्यातील स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे”, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. हे स्टेडियम चुकीच्या पद्धतीने हे उभारलं गेल्याचा आरोप उदयनराजे भोसलेंनी केला आहे. यावेळी, त्यांचा थेट निशाणा हा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर यांच्यावर आहे. उदयनराजे भोसलेंनी याविषयी फेसबूक पोस्टदेखील लिहिली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले की, “रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. रणजीही झाल्या. सातारा प्राईम एरिया आहे. स्टँडच्या शेजारी आहे. एवढं असताना स्टेडियम उभारलं गेलं नाही. बी. जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडियम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं. त्यांनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरसाठी फॉर्म भरला होता. हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना त्यांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला हवा. वाट्टोळं करून टाकलं सर्वांचं”, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.

आपण स्टेडियमचं टेंडर काढलं होतं, व्यापारी संकुलाचं नाही!

तत्कालीन पालकमंत्र्यांनी या सगळ्यांवर उत्तर द्यावं. प्रत्येकवेळी मी नाही, मी नाही, मी काय केलं? मी काय केलं? मुस्काडलं पाहिजे ह्यांना…ऐन मोक्यावरची जागा कशी मिळणार? आपण स्टेडियमचं टेंडर काढलं होतं, व्यापारी संकुलाचं नाही. मग स्टेडियमचं टेंडर काढलेलं असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले?” असाही प्रश्न यावेळी उदयराजेंनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न, निर्णय लवकर जाहीर होणार”

News Desk

राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदीच बांधणार !

News Desk

अमित राज ठाकरे तातडीने नाशकात, राज ठाकरे मोठी जबाबदारी देणार?

News Desk