HW News Marathi
महाराष्ट्र

“आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा”; भाजपचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देवस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीची वारी रद्द करण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आला. विरोधी पक्ष आणि महाविकासआघाडीमध्ये सतत विविध विषयावरून वादविवाद सुरु असतात. आषाढी वारी रद्द केल्याने भाजपने सेनेवर निशाणा साधला परंतु शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पलटवार करत भाजपला प्रत्युत्तर केलं होतं . भाजपाकडून आता थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत पलटवार करण्यात आला आहे. “उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,” असा टोला भाजपाने लगावला आहे.

तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा

कोरोनामुळे दुसऱ्यांदा आषाढीची वारी रद्द करण्यात अली असून मोजक्या वारकर्यांना परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण वारकरी समुदाय सार्कच्या या निर्णयावर नाखूष आहे. यावरून आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,” अशी टीका भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

वारकरी समुदाय नाराज

वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारी रद्द करण्यात आल्या. यंदाही करोनाच्या संकटामुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली. मोजक्याच दिंड्यांना परवानगी देण्यात आली. या दिंड्या बसमधूनच पंढरपुरात दाखल होणार आहेत. मात्र, या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली. भाजपाकडून करण्यात आलेल्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिक-स्नेही उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील चार शहरांचा केंद्राकडून गौरव

News Desk

अवकाळी पावसामुळे राज्यातील ३२५ तालुक्यांमध्ये तब्बल ५४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

News Desk

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna