HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाहीच !, सरकारच्या निर्णयावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

Lमुंबई । सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकासआघाडीसरकारची मोठी कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता राज्य सरकारने एक निर्णय घेत मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी केली आहे. तर हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाची सोपवण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर या मुद्द्यावरुन, याच मागणीसाठी भाजप मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला होता. त्यामुळे, सरकरच्या या निर्णयानंतर राज्यातील भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

अधिकारी बदलण्यापेक्षा राजकीय नेते म्हणून स्वतः त बदल केला तर…!

सरकारच्या या निर्णयाबाबत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतात की, पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन काही साध्य होईल असे नाही. दुसरीकडे पोलीस दलाचे राजकीयिकरण होणार नसेल आणि राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी वा कोणाचा सूड घेण्यासाठी पोलिसांचा वापर करणार नसतील तरच ही यंत्रणा योग्यरितीने चालेल. राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको. मार्गदर्शन असावं, पण स्वत:चा स्वार्थ साधण्याची वृत्ती नको. जेव्हा या पोलीस अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी तुम्ही चांगलं वातावरण निर्माण करता तेव्हा हेच अधिकारी चांगलं काम करू शकतात. अधिकारी बदलण्यापेक्षा राजकीय नेते म्हणून स्वतः त बदल केला तर पोलीस व्यवस्था उत्तम काम करु शकेल”, असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला दिला आहे.

पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाहीच !

मुनगंटीवार यांच्या या सरकारच्या निर्णयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. प्रवीण दरेकर याविषयी बोलताना म्हणतात की, “मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणं स्वाभाविक आहे. कारण, ज्या प्रकरणात वाझे नावाचा अधिकारी सहभागी होता त्यात त्याला पोलीस आयुक्त कंट्रोल करत होते. त्यामुळे, या प्रकरणात कधी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं असतं तर मुंबई पोलीसांना मोठा धक्का बसला असता. मात्र, पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाहीच. आमचं टार्गेट मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचं प्रकरण धसास लावणं हे आहे. म्हणूनच आम्ही हे प्रकरण लावून धरली”, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती”, राऊतांची मिश्लिल टिप्पणी  

News Desk

ठरावीक लोकांवर आणि वेळ साधून EDच्या कारवाया, उर्मिला मातोंडकरांची टीका

News Desk

‘लपून छपून काही होणार नाही, जे होईल ते समोरासमोर’, बाळा नांदगावकरांची माहिती

Jui Jadhav