HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात शिवसेनेनला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता !

पुणे । शिवसेनेच्या वाट्याला पुण्यातील एकही जागा आली नाही, यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या जागावाटपावरुन त्यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द झाली होती. यानंतर राज ठाकरेंची पुण्यातील पहिली सभा काल (१५ ऑक्टोबर) कसबा पेठेत पार पडली.

या सभेदरम्यान राज ठाकरे म्हणाले की, “पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवले नाही. पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवले नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता, असा सवाल राज ठाकरेंनी शिवसेनेला विचारला. तर बाळासाहेब असते तर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला यावेळी लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेसाठी नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्वाच्या शहरांमध्ये एकही जागा सोडलेली नाही.

सरकारने देशभरात स्मार्टसिटी तयार करण्याची घोषणा केली होती. त्या योजनेचे काय झाले? पुणे शहरात भरलेले पाणी, वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी? असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला. बहुमताचे सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असते. हे का होते? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो, असे राज ठाकरेंनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे आहेत का? पाहायला पाहिजे”; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

News Desk

पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण

News Desk

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Aprna