HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे आहेत का? पाहायला पाहिजे”; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

चिपळूण। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नेहमीच विरोधांवर आपला निशाणा साधत असतात. सध्या ते चिपळूणमध्ये पुरग्रस्थ परिस्थितीची पाहणी करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. संपूर्ण परिस्थितीला उद्धव ठाकरे यांचा पायगुण जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील भयावह परिस्थितीला जबाबदार कोण? त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे उत्तर देत मुख्यमंतरायणावर निशाणा साधला आहे.

पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा

नारायण राणे हे चिपळूण दौऱ्यावर आहेत . तिथली पाहणी करून झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण..आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. करोना काय? करोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले करोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा”, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

“पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.”, असा निशाणाही त्यांनी साधला.

राजकारण करण्याची ही वेळ नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चिपळूणला पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची ही वेळ नाही. सध्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढणं आणि नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ही घटना घडल्यानंतर प्रविण दरेकर सर्वात आधी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला आहे.

लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत उद्या दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र त्यांचा दौरा असणार आहे तर प्रत्येक ठिकाणी तात्काळ मदत केली जाईल असं दुर्घटनाग्रस्त नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले तर लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही, कोणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांचा अंदाज घेऊनच सरकार मदत करेल आणि आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील आमदारांचा वेतन, महागाई भत्ता जाणून घ्या

swarit

पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे! – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna

राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळय़ांवर राज्य करणे सोपे असते – सामना

News Desk