HW News Marathi
महाराष्ट्र

युतीबाबत आम्ही आशावादी, शिवसेना-भाजप नैसर्गिक मित्र आहोत !

मुंबई | युतीबाबत आम्ही आशावादी, शिवसेना-भाजप हे नैसर्गिक मित्र आहोत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे हेच चांगले आहे, असे मला वाटते, असे खळबळजनक व्यक्तव्य शिवसेना जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पाटालांनी हे युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य केले आहे.

पाटील पुढे म्हणाले की, “आम्ही ३० वर्षाचे जुने मित्र आहोत. एका अर्थाने रक्त आणि हिंदूत्व हे दोघांचे कॉमन आहेत. त्यामुळे पुन्हा एकत्र यावे, एकत्र सरकार चालवावे आणि एकत्र सरकार चालवायला हवे होते. कारण महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जनादेश खरे तर भाजप आणि शिवसेनेला होता. हा सर्व झाला आशावाद. पण, हो होणार आहे की नाही हे मला काही माहिती नाही, असे देखील त्यांनी म्हणत स्पष्ट केले. त्याचबरोबर पाटील म्हटले की, “भाजपने चर्चेसाठी दरवाजे हे त्यावेळीही खुले होते. आणि आताही खुले आहेत, आम्हाला अहंकार नसल्यामुळे आम्ही पुढाकार घेतला, पण येऊ दिले नाही. पण आता त्याचे स्वागत आहे. असे युतीसंदर्भात सकारात्मक विधान पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी आज (११ डिसेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पक्षावरील नाराजीवरही प्रतिक्रिया दिली.

“भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे हेच चांगले आहे असे मला वाटते. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील.” शिवसेना जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी काल (१० डिसेंबर) म्हटले आहे. जोशी पुढे म्हणाले की, “सध्या या दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.” पंरतु जोशींच्या या या धक्कादायक वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

युतीसंदर्भात जोशींनी केलेल विधान त्यांचे वैयक्तिक मत | गोऱ्हे

जोशींच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कविर्तक काढण्यास सुरुवात झाली. मात्र, जोशींनी केलेले विधान हे त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले आहे. याबाबतीत त्या म्हणाल्या की, मनोहर जोशींनी केलेले विधान वैयक्तिक, ती भूमिका शिवसेनेची नाही. त्यांच्या पिढीच्या मनात हे अशाप्रकारच्या भावना स्वाभाविक आणि भावनिक असले तरीही तरीसुद्धा ती पक्षाची भूमिका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना ही महाविकास आघाडी मजबूत आहे. चांगल्याप्रकारे ती लोकांसाठी काम करत आहे. भाजपा मित्रपक्षांना संपविण्याच्या दृष्टीने काम करते. ते व्यवहार्य नाही. त्यामुळे मनोहर जोशींचे विधान हे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

नेमके काय म्हणाले मनोहर जोशी

छोट्या मोठ्या गोष्टीवरुन झगडा करण्यापेक्षा काही गोष्टी सहन कराव्या. काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील त्या सांगाव्यात. एकत्र काम केलं तर दोघांच्याही फायद्याचे ठरेल. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्ताने किंवा आपला पक्ष पसरवण्याच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसे सध्या शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झाले आहे. याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर कधीच जाणार नाहीत असे नाही. योग्य वेळ येताच उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे मनोहर जोशी यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेले सत्ता संघर्ष

निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर मोठा पेच निर्माणा झाला होता. मात्र, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला नव्हता, असे भाजपकडून सांगण्यात आले. यामुळे राज्यात युतीला बुहमत असून देखील सत्ता स्थापन करता आली नाही. राज्यात सत्ता स्थापनेचा पेच इतक टोकाला गेला की, शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकासआघाडी असे नवे राजकीय समीकरण निर्माण करत राज्यात सत्ता स्थापन केले. आणि महाविकासआघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या दारी, विमानतळासाठी सुचवलं ‘हे’ नाव

News Desk

“कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, मात्र बेशिस्तपणा खपवून घेणार नाही!”- अनिल परब

News Desk

 हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये | यशोमती ठाकूर

News Desk