HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार, शरद पवारांची घोषणा

मुंबई | राज्यात पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगली या भागात पूर आल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज (२७ जुलै) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसे, संकटाचा सामना करण्याचा सरकारला अनुभव असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून जीवनावश्यक बाबींची मदत करणार, असंही पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुरग्रस्तांना मदत केली
  • राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करेल
  • अहवाल आल्यानंतर मदतीचं धोरण जाहीर करेल
  • कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार
  • जीवनावश्यक बाबी पाठवणार, गॅस, भांडी, सतरंजी पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी पाठवणार
  • २-३ दिवसांत पूरग्रस्त भागात मदत पोहोचेल
  • राज्याला पूराचा मोठा फटकापुरामुळे राज्याचं मोठं नुकसान
  • राज्यात ६ ते७ जिल्ह्यात पूरामुळे बिकट स्थिती
  • राज्य सरकारही मदत करेल
  • घरं, शेतीचं मोठं नुकसान झालं
  • १६ हजार कुटुंबांचं मोठं नुकसान
  • मदत करण्याची आवश्यकता
  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाना, जिल्ह्यांना मदतीची गरज
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत पाठवली
  • स्थानिक स्तरावरही कार्यकर्त्यांनी मदत केली
  • १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादीकडून मदत
  • जीवनावश्यक वस्तूंच वाटप
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने…रूपांतर हाणामारीत!

News Desk

जनसंघाचे २ खासदार असताना तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींना महानच म्हणायचा ना? पडळकरांना खरातांचा प्रतिप्रश्न

News Desk

HW Exclusive : मेट्रो, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प हे राज्याचे असतात, व्यक्तीचे नसतात, राऊतांचा फडणवीसांना टोला

Aprna