HW News Marathi
महाराष्ट्र

भारत बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमंच मुळात नकली, भाजपचा आरोप

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधा गेले १२ दिवस शेतकरी आंदलोन करत आहेत. तर उद्या (८ डिसेंबर) भारत बंदची हाक शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या या बंदला महाराष्ट्रातूनही पाठिंबा दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकरामधील सर्व पक्षांची या बंदला आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन भाजपने सरकारव टिका करत गंभीर आरोप केला आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत सरकारला टोला लगावला आहे. भाजपने शिवसेनचं शेतकरी प्रेम नकली असल्याचे म्हटले आहे. बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नाही, अशी टिका केशव उपाध्ये यांनी सरकारवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या-रामदास आठवले

News Desk

ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ग्राहकाची फसवणुकीचा आरोप

Aprna

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आकडेवारीवरुन सेना-भाजपमध्ये आगपाखड

News Desk