HW News Marathi
Covid-19

कोरोना संपल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल !

मुंबई | “कोरोनाचे संकट दूर महाराष्ट्रात भाजपचे सरकार निश्चित येईल”, असा थेट दावा कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी केला आहे. महाराष्ट्रातील ऑपरेशन कमळबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता शशिकला जोल्ले म्हणाल्या कि, “सध्या कोरोनाचे संकट आहे. मात्र, हे संकट दूर झाल्यानंतर राज्यात निश्चितच भाजपचे सरकार येईल.” दरम्यान, कर्नाटकच्या एका मंत्र्याने महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत केलेल्या या स्पष्ट दाव्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“कोल्हापूरमधील महापूरस्थिती लक्षात घेता यापूर्वी दोन्ही राज्यातील सरकारमध्ये कोणतेही समन्वय नव्हते. मात्र, सध्या दोन्ही राज्यात समन्वय साधले जात आहे. गेल्यावर्षी निर्माण झालेल्या भीषण पूरपरिस्थितीचा फटका दोन्ही राज्यातील जनतेला बसला होता”, असे म्हणत पुढे बोलताना शशिकला जोल्ले म्हणाल्या कि, “महाराष्ट्राचा जर विकास व्हायचा असेल तर भाजपचंच सरकार पाहिजे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर राज्यात निश्चितच भाजपचे सरकार येईल”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्ष वाढवा कोरोना नाही, मुख्यमंत्र्यांची सर्व राजकीय पक्षांना तंबी

News Desk

पुणेकरांनो लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार!

News Desk

Corona World Update : जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाखांच्या वर पोहोचली

News Desk