HW News Marathi
महाराष्ट्र

“भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा!”, नारायण राणेंचा छगन भुजबळांवर वार

रायगड | केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या जनाशीर्वाद यात्रेवर आहेत. या यंत्रे दरम्यान ते महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. आता त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाण साधला आहे. ओबीसी आरक्षणाच्या इम्पेरिकल डाटावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “हे भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. ते परत डोकं वर काढत आहेत”, असा बोचरा वार नारायण राणे यांनी केला आहे.

मराठा आणि ओबीसीचा मुद्दा क्लियर केले

छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीत पाठवू नये. तुम्ही सत्तेत होता 15 वर्ष काय केले? आता आम्ही काही तरी करत आहोत. आता राज्यात विरोधी पक्षात बसा, आता बस झालं तुमचं, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणे म्हणाले, “महापुरानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी रुपये पाठवले, आता राज्य सरकारने ते पैसे तातडीने वाटावे, अन्यथा मी परत पंतप्रधानांना सांगेन की आपली मदत वाटली गेली नाही, लोकांना मदत मिळत नाही”. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा हल्लाबोल राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

हे सरकार आहे तरी कुठे

नारायण राणे यांनी सरकारचे वाभाडे काढणार असल्याचं सांगितलं होतं. त्याला त्यांनी जनाशीर्वाद यात्रेच्या सुरुवाती पासूनच केलं आहे. हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली आहे.

कोकण माझं घर आहे

कोकण माझं घर आहे घरी आल्यावर आनंद होतोच. आज कोकणात येताना प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील सोबत आहेत. मी पाहिला दौरा कोकणचा केला. या दौऱ्याचा अहवाल घेऊन मी दिल्लीत गेलो. तिकडून मदत मागितली, केंद्राने 700 कोटी रुपये पाठवले. मी परत पंतप्रधानांना सांगेन की तुम्ही दिलेली मदत अजून लोकांना मिळालेली नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते  – जयंत पाटील

News Desk

मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी – नवाब मलिक

News Desk

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी

Aprna