HW News Marathi
Covid-19

आता कोणाला सांगणार ‘ही’ राजकारण करण्याची वेळ नाही !

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. येत्या २१ मे रोजी विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, शिवसेना २, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ तर भाजप ४ एकूण १० उमेदवार देण्यात आले आहे. काँग्रेसने आपले दोन उमेदवार विधानपरिषदेसाठी दिल्यामुळे महाविकासआघडीत बिघाड झाल्याच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. यावरून भाजपचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लागवला आहे.

जगदीश मुळीक ट्वीटमध्ये म्हणाले, “दिल्लीतील ‘मातोश्रीं’नी मुंबईच्या ‘मातोश्री’ला दिलेली मातृदिनाची अनोखी भेट विधान परिषदेला काँग्रेसचा दुसरा उमेदवार आता कोणाला सांगणार ही राजकारण करण्याची वेळ नाही!” राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वारंवार विरोधकांना ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे म्हणत टीका करतात. त्या अनुषघाने मुळीक यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

याआधी मुळीक यांनीएकीकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन निर्भिडपणे कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिकरीने लढा देण्याच्या ऐवजी फेसबुकवर जास्त दिसतात. महाराष्ट्राला गरज कर्तव्यदक्ष नेतृत्वाची!, असे ट्वीटमुख्यमंत्रांवर निशाणा साधला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणार, राजेश टोपेंची महत्वाची माहिती!

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार | मुख्यमंत्री

News Desk

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk