HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव प्रकरणी एफआयआर रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचार आणि अर्बन नक्सलचा संबंध असल्याच्या आरोप प्रकरणावरून आनंद तेलतुंबडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. आनंद तेलतुंबडे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. परंतु ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही. तसेच मी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत त्यांनी केला होता.

मुंबई उच्च न्यायालयात आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी (२१ डिसेंबर) सुनावणी झाली. न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली असून त्यांना सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यात दाद मागण्याची मुदत देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो शपथविधी ही चूकचं! हे सांगणारा मी पहिला होतो – संजय राऊत

News Desk

“वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?”

News Desk

जाणून घ्या… राज ठाकरेंनी ‘भोंग्यां’संदर्भात लिहिलेल्या पत्रातून मनसैनिकांना नेमके काय सांगितले

Aprna
राजकारण

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

News Desk

मुंबई | भिमाकोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले या नेत्यांच्या भूमिकांवरून राज्यभर वादळ उठले होते. मात्र प्रचारकी उडालेला धुरळा निवळल्यानंतर दलित आणि मराठा यांच्यात वाद लावून दरी वाढविण्यापेक्षा वाद मिटवून सामाजिक एकोपा निर्माण करणे हिताचे असल्याचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची समाज जोडणारी भूमिका योग्य असल्याची तरुणांना पटले आहे. त्यातून प्रबोधन झाल्याने मुंबईतील अनुशक्तीनगर येथील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सोडून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. भारिप बहुजन महासंघ सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांची मुंबई ठाणे नाशिक आदी जिल्ह्यांतून रामदास आठवलेंच्या संविधान बंगल्यावर रांग वाढू लागली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अनुशक्तीनगर तालुका अध्यक्ष गणेश गांगुर्डे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला . यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशीर्वाद घरून गणेश गांगुर्डेनी रिपाइं जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे, शिलाताई गांगुर्डे, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रमेश घोक्षे, महावीर सोनवणे,लिंबराज गायकवाड, रमाकांत शिरोळे, दिनेश शिंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे गरजेचे आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार असल्याची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची भूमिका योग्य असल्यानेच आपण रिपब्लिकन पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला असल्याचे मनोगत गणेश गांगुर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.

Related posts

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk

आंध्रप्रदेशमध्ये सीबीआयला बंदी

News Desk

#21daysLockdown | देशातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद

News Desk