HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव प्रकरणी एफआयआर रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचार आणि अर्बन नक्सलचा संबंध असल्याच्या आरोप प्रकरणावरून आनंद तेलतुंबडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. आनंद तेलतुंबडे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. परंतु ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही. तसेच मी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत त्यांनी केला होता.

मुंबई उच्च न्यायालयात आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी (२१ डिसेंबर) सुनावणी झाली. न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली असून त्यांना सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यात दाद मागण्याची मुदत देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम; कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Aprna

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार!- मंगलप्रभात लोढा

Aprna

कोरोनाची तिसरी लाट उसळण्याची शक्यता, उद्योगांना कामस्वरुपाचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk
मनोरंजन

अभिनेता अरमानला अवैध दारुसाठा प्रकरणी अटक

News Desk

मुंबई | बॉलीवुड अभिनेते अरमान कोहली जो बिग बॉससाठी एक स्पर्धक होता तसेच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. अभिनेता अरमानला मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री बेकायदेशीर दारू साठा ठेवल्या प्रकरणी अटक केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकल्यानंतर स्‍कॉच व्‍हिस्‍कीच्या ४१ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. कारण कोणताही एक व्यक्ती जास्तीत जास्त १२ बॉटल आपल्या घरी ठेवू शकत नाही.

मीडिया अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की गुरुवारी त्यांना अरमान कोहलीच्या घरामध्ये अवैध दारू ठेवण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली होती. याच माहितीनुसार, जुहूमध्ये अरमान च्या घरावर छापा टाकण्यात आला होता. यावेळी प्रमाणापेक्षा अधिक दारुसाठा आढळून आला आहे. विभागाने आपले घर छापले. जेथे ठराविक मर्यादा पेक्षा दारू पुनर्प्राप्त होते. त्यानंतर कोहलीला अल्कोहोल ऍक्ट, १९४९ कलम ६३ (ई) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

अरमान कोहलीला या एका वर्षात दुसऱ्यांदा अटक झाली आहे. या आधी त्याला जूनमध्ये गर्लफ्रेंड निरु रंधवा हिने अमानुश मारहाण केल्याचा आरोप केल्यामुळे अटक करण्यात आली होती.

Related posts

सईच्या आयुष्यावरची थरारकथा ‘डेट विथ सई’  

News Desk

Anant Chaturdashi 2018 | संत रोहिदास परिवार संघाचा अनोखा उपक्रम

News Desk

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल ।

News Desk