HW News Marathi
देश / विदेश

Bhima Koregaon Case : नवलखांची नजकैदेतून सुटका, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली | नवलखा यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मानवाधिकारी कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या सुटकेविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालय धाव घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नवलखा यांची सुटका केली होती. नवलखा यांना अटक करताना नियमाचे पालन न केल्याचा शेरा दिल्ली उच्च न्यायालयाने लावला आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालायकडे केली आहे.

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी नवलखा यांच्या पाच विचारवंताना पुणे पोलिसांनी अटक केले होते. नवलखा यांचा नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर लावला होता. या पाच विचारवंताच्या सुटका आणि त्यांच्यावरील कारवाईत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आठवड्या भरापुर्वी नकार दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाकडे अटके विरोद्धात दाद मागण्याची मुभा दिली आहे.

नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यापुर्वी नवलखा यांनी दिल्ली हायकोर्टात ‘ट्रान्झिट रिमांड’ला आव्हान दिले होते. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानंतर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात नवलखा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने या सुनावणीत नवलखा यांना दिलासा दिला होता. उच्च न्यायालयाने दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने दिलेला ‘टान्झिट रिमांड’ रद्द केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पाकिस्तानचा मोठा कट उधळला!’

News Desk

सकाळचा नाष्टा गडकरींच्या घरी; एकनाथ खडसे, रक्षा खडसे गडरींच्या भेटीला

News Desk

पाकिस्तानने शारीरिक नाही तर माझा मानसिक छळ केला !

News Desk
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इंटरनॅशनल सोलर अलायंस आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा सन्मान दिला जातो. ‘पॉलिसी लिडरशीप’ या विभागातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. संयुक्त राष्ट्राने काही दिवसांआधीच या पुरस्काराची घोषणा केली होती. यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तिथे उपस्थित होत्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मँक्रो यांनादेखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात घेतलेल्या ऐतिहासिक पुढाकारामुळे पंतप्रधान मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णत: सौरऊर्जेवर कार्यरत असणारे देशातील पहिले विमानतळ आहे. सस्टेनेबल एनर्जी क्षेत्रातील गतिमानतेसाठी दाखविलेल्या दूरदृष्टीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Related posts

2 इंचांमुळे असे काही घडले, त्याला पाच लाख मोजावे लागले

News Desk

ड्रोनच्या हल्ल्यात केरळच्या युवकाचा मृत्यू

News Desk

ममता बॅनर्जींच्या अधिकाऱ्याचा मुलगा ‘कोरोना’बाधित

News Desk