HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्ह्याच्या बाहेरही बस सेवा होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय!

मुंबई | गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तिकिट दरांमध्ये काहीही बदल होणार नाहीत. एसटी सेवा सुरु होणार असल्याने एका जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांना, लोकांना जिल्हा बदलून प्रवास करता येणार आहे. ई पास सोबत असणे आवश्यक असणार आहे. तसेच, बस प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य असेल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील भर पावसात भिजले आणि सातारच्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली…

News Desk

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।

News Desk

पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव – जयंत पाटील

News Desk