HW News Marathi
महाराष्ट्र

पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत,रोहित पवार

मुंबई | आज (१९ ऑगस्ट) सुप्रीम कोर्टाने सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे सोपवला आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारवर आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर टीका करण्यास सुरुवात झाली. मात्र, राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई पोलिसांची आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. आता ट्विट करत त्यांनी भाजप नेत्यांना काही गोष्टींचा विसर पडला का असा प्रश्न विचारला आहे.

शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते. याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन महाराष्ट्र सरकारला धारेवर दरणाऱ्या भाजप नेत्यांना विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असा खरमरीत टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

तसेच, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसेच, या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीची मला आदर असून माझा या संस्थेवर पुर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ओबीसींचा गुरुवारी ‘आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’, छगन भुजबळ करणार नेतृत्व!

News Desk

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत! – तानाजी सावंत

Aprna

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा! – मुख्यमंत्री

Aprna