HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

मुंबई | राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, १५ मे नंतरही ते वाढणार की शिथिल होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आज (१२ मे) होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. पंरतु, समाधानाची बाब ही आहे की, राज्यात सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे वाढत्या आकडेवारीत घसरण झाली आहे.

कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या कमी होत आहे. आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्यांही वाढलेली आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध वाढणार की नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार, यासंबंधिच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत कोरोना अजूनही वाढत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; शासन निर्णय जारी

News Desk

ओमिक्रोनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही ! उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

News Desk