HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, नव्या चेहऱ्यांना संधी?

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाच्या दोन जागा रिक्त होऊन नवीन चेहेरे दिसण्याचे संकेत आहेत. यात आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा नावाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसमध्ये ही फेरबदल

शिवसेना आणि राष्ट्रवादीसह आता काँग्रेस देखील मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या विचारात आहे. के. सी पाडवी यांच्याजागी आदिवासी चेहरा तर अस्लम शेख यांच्या जागी मुस्लीम चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणाचा आरोप असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाव आल्यानं संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या दोघांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीकडील प्रत्येकी एक मंत्रिपद रिक्त आहे.

मंत्री पोहोचले दिल्लीत

काँग्रेसच्या मंत्र्यांना डच्चू देणार अशी चर्चा चालू असताना काही मंत्री हे थेट दिल्लीत पोहोचले आहेत. अलीकडेच नितीन राऊत यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातही दिल्लीत भेटीगाठी घेणार आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून तिन्ही पक्ष मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांना बढती मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या शहर गृहराज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे.

कोणत्या नेत्यांना डच्चू देण्याची तयारी?

राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन चेहेरे दिसण्याची शक्यता सुरु आहे. राष्ट्रवादीतून अनिल देशमुख, काँग्रेस मधून अल्सम शेख तर के. सी पाडवी यांना पक्षाकडून डच्चू देण्याची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा आहे आणि त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात येईल अशीही चर्चा रंगात आहे. सरकार काय निर्णय घेईल हे बघणं महत्वाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘ऑक्सिजनची कमतरता नव्हती’, तर संवेदनशीलता आणि खरेपणाची मोठी कमतरता, राहुल गांधींचा केंद्रावर आरोप!

News Desk

सचिन वाझेंनंतर अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांचीही हकालपट्टी करा ! | किरीट सोमय्या

News Desk

नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला

News Desk