HW News Marathi
महाराष्ट्र

काहीच कल्पना न देता राजभवनात बोलविले !

मुंबई | महाराष्ट्रच्या राजकारणार अनपेक्षित असे वळण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना राजभवनात बोलविण्यात आले होते. यातील तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

“मी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर आज (२३ नोव्हेंबर) ८-१० आमदार त्याठिकाणी जमा होते. तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आले. राज्यपाल निवासस्थानी जाताना आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आले. राज्यपाल उपस्थित झाले अन् धक्कादायकपणे शपथविधी झाला. शपथविधी झाल्यानंतर आम्ही ताबडतोब शरद पवारांच्या निवासस्थानी गेलो, त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला, आम्ही राष्ट्रवादीसोबतच आहोत. आम्हाला अज्ञात ठेऊन हे सगळे करण्यात आले असा आरोप असे बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

तसेच “आम्हाला सकाळी ७ वाजता धनंजय मुंडेच्या घरी पोहोचण्याचा निरोप दिला. त्यानंतर आम्हांला राजभवनात नेत्यात आले. शपथविधी बाबत राजभवनात जाईपर्यंत आम्हाला पुसटशीही कल्पना देण्यात आली नव्हती. अचानक अजित पवार यांचा शपथ विधी पाहिल्यानंतर आम्हाला एकूण परिस्थिती लक्षात आली, अशी प्रतीक्रिया डॉ. शिंगणे यांनी दिली.

अजित पवारांनी राज्यपालांना फसविले – शरद पवार

नाव आणि स्वाक्षरीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची यादी कार्यालयात ठेवली होती. अजित पवारांनी ती यादी घेतली आणि राजभवनावर गेले. ती यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केल्याचा आराप अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. अजित पवारांसोबत १० ते ११ आमदार होते, असा दावा शरद पवारांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून निर्माण होणारा एकोपा महत्त्वाचा! – सुनील केदार

Aprna

बीडच्या गेवराईत वाळूपट्ट्यात गस्त घालणाऱ्या महसूल पथकाच्या वाहनाचा दुर्दैवी अपघात!

Aprna

“महाराष्ट्राची अवस्था आई नीट जेवू देईन अन् बाप भीक मागू देईना”, अशी झाली आहे, महापौरांनी केंद्राला सुनावले

News Desk