HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंवर गुन्हा दाखल! मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द बोलण्याने गुन्हा दाखल

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जनाशीर्वाद यात्रेवर आहेत. यात्रा सुरु होण्यापूर्वी ते सरकारचे वाभाडे काढणार असल्याचं म्हणत होते, आणि अगदी तसंच यात्रा चालू झाल्यापासून ते ठाकरे सरकारवर निशाणा साधून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ते घोषणा देत आहेत. याचाच आक्षेप घेत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल

नारायण राणे यांच्यावर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तसेच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्याअतंर्गत आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

पिंजऱ्यात राहतो… हा कसला मुख्यमंत्री

आताचे राज्य, या राज्याला मुख्यमंत्री आहे, मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण आहे? काही दम नाही ओ, पिंजऱ्यात राहतो…हा कसला मुख्यमंत्री? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही,” अशी टीका राणे यांनी केली. “जनतेत जायला पाहिजे, प्रश्न काय, अडचणी काय, काय केल्याने बेकारी जाईल यावर विचार केला पाहिजे,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.

मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

मातोश्रीचं परिवर्तन झालं एकाचे दोन बंगले झाले

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. मग मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन का होऊ शकलं नाही? मोतश्रीचं परिवर्तन झालं. एकाचे दोन बंगले झाले. मराठी माणसाच्या जीवनामध्ये काहीही फरक नाही. आजही मराठी तरुणांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिक घरी जातो तेव्हा चुल पेटली की नाही, आईने काही शिजवलं असेल की नाही, ही चिंता असते. त्यालाही वेळ का आली?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.३२ वर्षांत मुंबई बकाल करून टाकली. किती माणसं मुंबईत कोरोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा,” असं राणेंनी म्हटलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५वी आणि ८वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाडांची घोषणा

News Desk

तर शेतकऱ्यांची मुले हातात दगड घेतील…राजू शेट्टी यांचा केंद्राला इशारा 

News Desk

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, राज्यातील कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा?

News Desk