HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद आंदोलन स्वरूपात उमटले होते. याच मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहे. त्यामुळे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

दरम्यान, हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उध्दव ठाकरे तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, राणे पुत्रांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk

आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही!

News Desk

संजय राऊत आणि नवाब मालिकांना शाहरुखने भाड्याने घेतलंय!, नितेश राणेंची बोचरी टीका

News Desk