HW News Marathi
महाराष्ट्र

ध्वनी प्रदूषणामुळे २०२ गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल

मुंबई | गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मुंबईतील एकूण २०२ मंडळांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बाप्पाच्या आगमनापासून (१३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर) विसर्जनापर्यंत या मंडळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळल्यामुळे गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

गणेशोत्सव काळात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६५ ते ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणआऱ्यावर २०२ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच पुण्यात डीजे आणि डॉल्बीवर उच्च न्यायालयाने बंदी घातली असातना, देखली काही मंडळांनी गणेश विसर्जनाच्या वेळी डीजे आणि डॉल्बीवर वाजवल्या प्रकरणी पुण्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३० मंडळांवर गुन्हा दाखल केला असल्याचे पुण्याचे संयुक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करते का?

Aprna

HW Exclusive: विषारी पाण्याचे गाव, १४ लाख लोकांचा जीव धोक्यात

News Desk

शरद पवारांच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्विटर युद्ध

Aprna
देश / विदेश

कमांडर अभिलाष यांना सुखरूपपणे वाचविण्यात यश

Gauri Tilekar

मुंबई | भारतीय नौसेनेतील जवान आणि गोल्डन ग्लोब रेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे कमांडर अभिलाष टॉमी यांना सुखरूपपणे वाचविण्यात अखेर यश आले आहे. गोल्डन ग्लोब रेस स्पर्धेत अभिलाष हे दक्षिण हिंदी महासागरात वादळी वाऱ्यामुळे जखमी झाले होते. अभिलाष यांना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाची आएनएस सातपुडा आणि ऑस्ट्रेलियन नौदल यांनी संयुक्त मोहीम राबविली होती.

अभिलाष यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी आपण जखमी असल्याचे सांगून स्ट्रेचरची मागणी केली होती. गोल्डन ग्लोब रेस नौकायन स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील नावाजलेले नौकायनपटू भाग घेतात. यावर्षी फ्रान्स मधून 1 जुलैपासून ही स्पर्धा सुरु झाली. अभिलाष यांच्या सुटकेसाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत होती.

गोल्डन ग्लोब रेस स्पर्धेतून अभिलाष यांनी न थांबता जगाला प्रदक्षिणा घातली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी त्यांना विशेष प्रतिनीधी म्हणून आमंत्रित केले गेले होते. अभिलाष हे मुळचे मुंबईचे आहेत. गेल्या तब्बल १८ वर्षापासून नौदलामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून त्यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले समाधान व्यक्त

अभिलाष यांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले म्हणून समाधान व्यक्त केले आहे. तसेच अभिलाष यांना आयएनएसमधून मॉरिशियसमध्ये उपचारासाठी आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर प्राथमिक व गरजेनुसार उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून दिली आहे.

Related posts

शेतकरी आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणात पुढे आलेले एक नाव म्हणजे ‘दीप सिद्धू’, कोण आहे हा?

News Desk

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

News Desk

मॉनिटर, टीव्हीसह अन्य अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk